लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्यांवर होणार कारवाई ; १००० रूपये दंड किंवा ६ महिन्याची जेल
रूपये राज ठाकरेंची नवी दिल्ली : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन घोषित केले आहे. लॉकडाऊनचे उल्लंघन करणार्यांना १००० रुपये दंड आकारला जाईल किंवा ६ महिने तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते, असे केंद्र सरकारने आपल्या निर्देशात स्पष्ट केले आहे. केंद्र सरकारने जारी केलेल्या परिपत्रकात स्पष्टपणे म्हटले आहे की, लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. कोरोना विषाणूचा वाढती दहशत रोखण्यासाठी देशातील २३ राज्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. दिल्ली, उत्तराखंड, बिहार, महाराष्ट्र यासह अनेक राज्यात ३१ मार्चपर्यंत लॉकडाऊन जाहीर लोकांना गर्दीत जाण्यापासून रोखणे लॉकडाऊन हा एकमेव उद्देश आहे. जेणेकरुन देशात कोरोना विषाणू स्टेज -३ मध्ये जाऊ नये.काही राज्यांमधून नियमांचे पालन न केल्याची वस्तू खरेदीच्या नावाखाली लोक बाहेर फिरताना दिसतात आणि आता ही परिस्थिती टाळण्यासाठी केंद्र सरकारने परिपत्रकात जाहीर केले आहे. पंतप्रधान मोदी यांनी या संदर्भात जेल ट्रिट केले ते म्हणाले, 'अजनही बरेच लोक अजूनही लॉकडाऊन गांभीर्याने घेत नाहीत. ही चिंतेची बाब आहे कोरोनाच्या संकटाशी लढा द्यायचा असेल तर लॉकडाऊन गांभीर्यानं घ्या. घरी थांबा, स्वतःचा आणि कुटुंबीयांचा जीव धोक्यात घालू नका. सरकारने दिलेल्या निर्दे शाचे पालन करा असंही त्यांनी म्हटलं आहे. तसंच देशातल्या सगळ्या राज्य सरकारांनी नियम आणि कायदे पाळावेत कोरोनो विषाणूची लागण झालेल्या लोकांची संख्या देशात ४१८ झाली आहे आणि महाराष्ट्रात काल रात्रीपासून केवळ २२ नवीन रुग्ण आढळले आहेत. यानंतर महाराष्ट्रात कोरोना विषाणूमुळे लागण करणाऱ्यांची संख्या ८९ झाली आहे.